Monday 19 December 2022

जोतीराव गोविंदराव फुले

 जोतीराव गोविंदराव फुले


जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील

कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा

जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या

वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.

वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे

गोर्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ

झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर

तालुक्यातील खानवडी येथे आला.तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे.

प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचाव्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक

शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन

हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.

बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा

वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.सामाजिक कार्य

सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुलेयांनी *सत्यशोधक समाजाची* स्थापना

केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून

होणार्या अन्यायापासून, अत्याचारापासून व

गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची

मुक्तता करणे व त्यांना हक्काचीजाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय

होते.

 'सर्वसाक्षी जगत्पती ।

त्यालानकोच मध्यस्ती॥' 

हे या समाजाचे

घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने

गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिकन्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची

मागणी केली. 

समाजातील विषमता नष्ट करणे व

तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हेसत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या

कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या

खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -


“ विद्येविना मतीगेली।

 मतीविनानीतीगेली।

नीतीविनागती गेली।

गतीविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ

एका अविद्येने केले।। ”


जोतीरावांनी त्यांच्या पत्नी

सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास

प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढझालेली भारतातील पहिली

महिला म्हणजे सावित्रीबाई.त्याचप्रमाणे

स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारेमहात्मा फुले पहिले भारतीय होत.

वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे

शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या

विचारवंताच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष

प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्यआणिसमाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ

होत असत. ही सामाजिक परिस्थिती

सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे

आपल्या पत्नी सावित्रीबाईंना १८४८

साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतीलभिडे यांच्या वाड्यात पहिली

मुलींची शाळा काढून

तेथीलशिक्षिकेचीजबाबदारी सावित्रीबाईंवर

सोपविली. महाराष्ट्रातील

स्त्री शिक्षणाची ही

मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्यमुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत

१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या याकार्यालासनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पणजोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज

सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी

व व्यापक करण्यासाठी १८७३ साली

त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची

स्थापना केली. ‘कोणताही धर्म

ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व

जातिभेद ही निर्मिती

मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्रया विश्वाची निर्मिती

करणारी कोणती तरी

शक्ती आहे अशी

त्यांचीविचारसरणी होती. मानवाने

गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनीलिहिलेल्या ‘शेतकर्याचा असूड’ 

या पुस्तकातून

महाराष्ट्रातील शेतकर्यांची विदारक

दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशदकेली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा

क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे

दर्शन होते.

 ‘नीती हाच

मानवी जीवनाचा आधार आहे’

 हाविचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक

व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतातसाहित्य आणि लेखन

' सार्वजनिक सत्यधर्म ' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण

ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्रम्हणून

' दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे.

तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या

धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड'रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील

कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित

केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचाअप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा

ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशितझाला.सन्माननीयउपाधी

जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखलघेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही

उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले

हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.

इ.स. १८४८  भारतातील

मुलींची पहिली शाळा सुरूकेली. बहुजन समाजाच्या

शिक्षणासाठी काम सुरू केले.सप्टेंबर ७, इ.स. १८५१  भिडे वाड्यात व रास्ता पेठेत

मुलींच्या शाळेची सुरुवात.

इ.स. १८५२  पूना लायब्ररीची

स्थापना.

मार्च १५, इ.स. १८५२ वेताळपेठेत

अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू

केली.

नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी

यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश

सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यातसत्कारकरण्यात आला.

२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.

विद्याध्यायानासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,

त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर

प्रवास.

परि स्त्री शिक्षण; हा एकची असे

ध्यास, हा एकची असे ध्यास,

या उक्तीप्रमाणे महात्मा ज्योतीराव

फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व

स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा

कृतीशील क्रांतिकारकाचा होता.

महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून

जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते

थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक

म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते

सामान्यांतील असले तरी विचाराने व

कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध

ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व

समता' या दोन शब्दातच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन

करता येईल. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते.


No comments:

Post a Comment