Friday 23 December 2022

हळदीचा उपयोग

 *आरोग्य धनसंपदा*


  *हळदीच्या सेवनाने झपाट्याने कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल?

----------------------------------------


      प्राचीन काळापासून हळदीचा वापर आरोग्यासाठी केला जातो. कोलेस्ट्रॉलच्या समस्येवरही हळद उपयुक्त ठरू शकते. फक्त वापरण्याची पद्धत एकदा जाणून घ्या

     हळद आपल्याला प्रत्येक घरामध्ये पाहायला मिळते. हळदीचा वापर सामान्यतः घरांमध्ये जेवण चवदार बनवण्यासाठी केला जातो. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळद खूप फायदेशीर आहे. हळदीचा वापर प्राचीन काळापासून संसर्ग, जखम आणि पोटाच्या समस्यांसाठी केला जातो. हळद हा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे जी कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या रोगांवर उपचार करण्यास मदत करते. हळदीचे आरोग्यदायी फायदे बाजारात सहज उपलब्ध आहेत आणि ती विविध प्रकारे वापरली जाऊ शकते. हळद रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवून हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत करू शकते. चला जाणून घेऊया हळदीचे सेवन कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी कसे उपयुक्त ठरते?


 *हृदयविकारात फायदेशीर*  शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल म्हणजे तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्यापासून स्ट्रोकपर्यंत कोणत्याही गोष्टीचा धोका असू शकतो. अशा परिस्थितीत हळदीसोबत कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यासाठी वेळोवेळी अनेक अभ्यास आणि संशोधन केले गेले आहेत. प्राणी आणि मानवांवर केलेल्या संशोधनानुसार हळदीचे सेवन केल्याने रक्तातील कोलेस्टेरॉलच्या पातळीवर तीन प्रकारे परिणाम होतो.


 *1) LDL कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणे...* 

लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजेच LDL कोलेस्टेरॉलला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात आणि त्यामुळे हृदयाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. हळदीचे सेवन केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते.


 *2) ऑक्सिडेशनपासून एलडीएल कोलेस्टेरॉलचे संरक्षण*

 एथेरोस्क्लेरोसिस तेव्हा होतो जेव्हा एलडीएल कोलेस्टेरॉल ऑक्सिजनसह प्रतिक्रिया देते, ज्यामुळे रक्ताभिसरणात अडथळा येऊ शकतो. हळदीचे सेवन केल्याने हे ऑक्सिडेशन थांबते, त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि रक्तवाहिन्याही निरोगी राहतात.


 *3) ट्रायग्लिसराइड पातळी कमी करणे* 

उच्च रक्तातील कोलेस्टेरॉलसह उच्च ट्रायग्लिसराइड पातळी हृदयाच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकते. ट्रायग्लिसराइड देखील धमन्यांमध्ये तयार होते, ज्यामुळे LDL कोलेस्टेरॉल रक्ताभिसरण समस्या निर्माण करणे सोपे होते. हळदीच्या वापराने ट्रायग्लिसराइडचे प्रमाण नियंत्रित करता येते.


     हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रोज भाज्यांमध्ये हळदीचा वापर करावा. तसेच रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात चिमूटभर हळद टाकून प्यावे. याशिवाय रोज एक कप ग्रीन टी प्यायल्याने उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.


*(कॉपी पेस्ट)*


*निरोगी सुप्रभात.*

लिंबुच्या पानाचे फायदे

 *आरोग्य धनसंपदा*


*लिंबुच्या पानांचे आहेत एवढे विलक्षण फायदे की तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसणार; पृथ्वीवर जणू हा रामबाणच.....!*


खरतर लिंबाच्या पानांचा आपण वर्षभर उपयोग करू शकतो व त्याचा फायदा घेऊ शकतो. आजच्या आमच्या या माहितीद्वारे आम्ही तुम्हाला या पानांचे खास फायदे सांगणार आहोत जे खूपच औषधी आहेत. हजारो वर्षांपासून याचा प्रयोग केला जात आहे. अनेक आजारांना याच्या मदतीने आपण दूर ठेवू शकतो. आयुर्वेदात याचे खूपच महत्व आहे. 


आज आपण लिंबाच्या पानांचे फायदे बघूया. तुमच्या जवळपास ही पाने मिळू शकतात. तुम्ही याचा प्रयोग करू शकतात. आयुर्वेदात माहिती महत्वाची आहे, योग्य प्रमाण खूप महत्वाचे आहे. तरच त्याचा फायदा मिळतो. याच्याबद्दल विस्ताराने जाणून घेऊ या. 


◼️महत्त्वाचे म्हणजे लिंबाचे पान जर हातात घेऊन ते चुरुन किंवा रगडून त्याचा वास घेतला, तर डोकेदुखीमध्ये आराम पडतो. कोणाला डोकेदुखी, अर्धशिशी, मायग्रेन असेल तर लिंबाच्या पानाचा प्रयोग करून तुम्ही ठीक होऊ शकता. याची पाने हातात रगडून ५ मिनिटे श्वास घ्या, तुम्हाला आराम मिळेल.


◼️ही पाने तुमच्या चेहर्‍यावरील डाग, खड्डे, मुरूमे दूर करण्यासाठी फायदेमंद आहेत. ही खूपच दिव्य अशी औषधी आहे. याची पाने घ्या, छोटी ५ ते ६ पाने घ्या, ती वाटून घ्या व त्यात मध मिसळून चेहर्‍यावर लावा. दिवसातून एकदा हा प्रयोग करून बघा, चेहर्‍यावरील सुरकुत्या, डाग, मुरूमे दूर होतील व चेहरा चमकदार होईल.


◼️लिंबाच्या पानांचे खूप फायदे आहेत.कोणाला त्वचारोग असेल, खाज, खरूज, नायटा, फोड असेल, तर ते दूर करण्यासाठी लिंबाची पाने खूपच उत्तम असे औषध आहे. त्या साठी एक साधा प्रयोग करून बघा. पाने वाटून त्याची पेस्ट बनवा, त्यात थोडा कापुर व कडुनिंबाचे तेल मिसळा. एक चिमुट हळद घाला. सगळे व्यवस्थित मिसळा व जिथे तुम्हाला खाज, खरूज, नायटा असेल त्याजागी ही पेस्ट लावा. कोणत्याही प्रकारच्या त्वचारोगात ह्याचा लेप खूपच फायदेशीर आहे. त्वचारोग नाहीसा होतो, खूपच दिव्य औषध आहे हे.


◼️केसांमधील कोंडा नाहीसा करण्यासाठी पण याचा उपयोग होतो. पाने वाटून पेस्ट बनवून केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मालीश करा. १ ते २ वेळा लावल्यामुळे केसातील कोंडा नाहीसा होतो.


पोटात जंत झाले असतील, साधारण लहान मुलांच्या बाबतीत जर पोटात जंत झाले, तर लिंबाच्या पानांचा ५ मिली रस घेऊन त्यात हलका मध घालून मुलाला पाजा, त्याच्या पोटातील जंत मरतील या रसाने. मोठ्या माणसासाठी १० मिली रस जरूरी आहे.


◼️कावीळ झाली असेल, तर त्यासाठी पानांचा १० मिली रस काढून तो ताकात मिसळून त्याचे सेवन करा. १० ते १२ दिवस हे घेतले तर कावीळ ठीक होते. हा काविळीसाठी रामबाण उपाय आहे.


◼️पोटातील कोणत्याही समस्येवर म्हणजेच गॅस, पोटदुखी, बद्धकोष्टता यावर हा उपाय प्रभावी आहे.


खरंतर सर्वांन माहीत आहे लिंबू खाण्याचे किती फायदे आहेत त्याचप्रमाणे याची पाने सुद्धा खूपच फायदेशीर आहेत. याच्या पानांचा काढा रक्त शुद्ध करतो. पाने घालून चहा बनवून घेऊ शकता.


*(काॅपीपेस्ट)*


*निरोगी सुप्रभात.*

Wednesday 21 December 2022

लघवीच्या तपासणीने काय समजते ?

 *आरोग्य धनसंपदा*


  लघवीच्या तपासणीने काय समजते ?

तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला तक्रारी विचारतात. तुमची तपासणी करतात. बऱ्याचदा तुम्हाला पॅथाॅलॉजी लॅबमध्ये जाऊन लघवीचे तपासणी करायला सांगतात. लघवीच्या तपासणीतून डॉक्टरांना काय समजते, ते आता समजावून घेऊ.

मूत्रपिंडामध्ये सतत रक्त गाळले जात असते. या प्रक्रियेत रक्तातील विषारी, टाकाऊ पदार्थ, अतिरिक्त पाणी आणि क्षार रक्तातून बाहेर काढले जातात. याचाच परिणाम म्हणून लघवी तयार होते. शरीरात चालणार्‍या चयापचयामुळे लघवीतील घटकही बदलत असतात. आता सामान्यपणे लघवीच्या ज्या तपासण्या केल्या जातात त्यामुळे काय समजते ते पाहू.

लघवीमध्ये सामान्यतः ग्लुकोज असायला नको. लघवीत जर ग्लूकोज असेल तर रुग्णाला मधुमेह असण्याची शक्यता असते. लघवीत अल्बुमिन हे प्रथीन जास्त प्रमाणात असले तर रुग्णाला मूत्रपिंडाचा विकार, गरोदरपणातील उच्च रक्तदाब इत्यादी रोग असण्याची शक्यता असते. 

लघवीत पित्ताचे क्षार किंवा बिलीरुबीन, युरोबिलीनोजेन आदी पदार्थ असतील तर कावीळ असण्याची शक्यता असते. लघवी मध्ये स्फटिक असतील तर अशा रुग्णांमध्ये क्षारांच्या चयापचयात दोष असू शकतो. लघवीत काही संप्रेरके आढळून आल्यास विशिष्ट रोगांचे निदान होऊ शकते. गरोदरपणाची खात्री अशाच प्रकारच्या एका तपासणीमुळे करता येते. 

लघवीत पू येत असेल तर मूत्रमार्गात काही जंतुसंसर्ग असू शकतो. लघवीत रक्त वा रक्तातील लाल रक्तपेशी येत असतील; तर मुतखडा, मुत्रपिंडाचा क्षयरोग किंवा मूत्रमार्गातील जखम यांसारखे रोग असू शकतात. लघवीमध्ये काही जंतू असले किंवा पू मधील पेशी असल्या, तर मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्गाचे निदान होऊ शकते.

याखेरीज लघवीचे प्रमाण, लघवी करताना वेदना होणे, लघवी करताना जळजळ होणे, लघवी वारंवार होणे, लघवी न होणे; या सर्वांमुळेही काही रोगांचे निदान होऊ शकते. यावरुन तुमच्या लक्षात येईलच की, लघवी तपासल्याने अनेक गोष्टी कळु शकतात. त्यामुळे कंटाळा न करता लघवीची तपासणी करायला हवी.


डॉ. जगन्नाथ दीक्षित

डाॅ. अंजली दीक्षित

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून

मनोविकास प्रकाशन




Monday 19 December 2022

जोतीराव गोविंदराव फुले

 जोतीराव गोविंदराव फुले


जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील

कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा

जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या

वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.

वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे

गोर्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ

झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर

तालुक्यातील खानवडी येथे आला.तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे.

प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचाव्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक

शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन

हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.

बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा

वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.सामाजिक कार्य

सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुलेयांनी *सत्यशोधक समाजाची* स्थापना

केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून

होणार्या अन्यायापासून, अत्याचारापासून व

गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची

मुक्तता करणे व त्यांना हक्काचीजाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय

होते.

 'सर्वसाक्षी जगत्पती ।

त्यालानकोच मध्यस्ती॥' 

हे या समाजाचे

घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने

गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिकन्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची

मागणी केली. 

समाजातील विषमता नष्ट करणे व

तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हेसत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या

कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या

खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -


“ विद्येविना मतीगेली।

 मतीविनानीतीगेली।

नीतीविनागती गेली।

गतीविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ

एका अविद्येने केले।। ”


जोतीरावांनी त्यांच्या पत्नी

सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास

प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढझालेली भारतातील पहिली

महिला म्हणजे सावित्रीबाई.त्याचप्रमाणे

स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारेमहात्मा फुले पहिले भारतीय होत.

वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे

शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या

विचारवंताच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष

प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्यआणिसमाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ

होत असत. ही सामाजिक परिस्थिती

सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे

आपल्या पत्नी सावित्रीबाईंना १८४८

साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतीलभिडे यांच्या वाड्यात पहिली

मुलींची शाळा काढून

तेथीलशिक्षिकेचीजबाबदारी सावित्रीबाईंवर

सोपविली. महाराष्ट्रातील

स्त्री शिक्षणाची ही

मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्यमुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत

१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या याकार्यालासनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पणजोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज

सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी

व व्यापक करण्यासाठी १८७३ साली

त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची

स्थापना केली. ‘कोणताही धर्म

ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व

जातिभेद ही निर्मिती

मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्रया विश्वाची निर्मिती

करणारी कोणती तरी

शक्ती आहे अशी

त्यांचीविचारसरणी होती. मानवाने

गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनीलिहिलेल्या ‘शेतकर्याचा असूड’ 

या पुस्तकातून

महाराष्ट्रातील शेतकर्यांची विदारक

दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशदकेली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा

क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे

दर्शन होते.

 ‘नीती हाच

मानवी जीवनाचा आधार आहे’

 हाविचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक

व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतातसाहित्य आणि लेखन

' सार्वजनिक सत्यधर्म ' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण

ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्रम्हणून

' दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे.

तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या

धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड'रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील

कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित

केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचाअप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा

ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशितझाला.सन्माननीयउपाधी

जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखलघेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही

उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले

हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.

इ.स. १८४८  भारतातील

मुलींची पहिली शाळा सुरूकेली. बहुजन समाजाच्या

शिक्षणासाठी काम सुरू केले.सप्टेंबर ७, इ.स. १८५१  भिडे वाड्यात व रास्ता पेठेत

मुलींच्या शाळेची सुरुवात.

इ.स. १८५२  पूना लायब्ररीची

स्थापना.

मार्च १५, इ.स. १८५२ वेताळपेठेत

अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू

केली.

नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी

यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश

सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यातसत्कारकरण्यात आला.

२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.

विद्याध्यायानासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,

त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर

प्रवास.

परि स्त्री शिक्षण; हा एकची असे

ध्यास, हा एकची असे ध्यास,

या उक्तीप्रमाणे महात्मा ज्योतीराव

फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व

स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा

कृतीशील क्रांतिकारकाचा होता.

महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून

जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते

थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक

म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते

सामान्यांतील असले तरी विचाराने व

कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध

ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व

समता' या दोन शब्दातच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन

करता येईल. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते.


संत गाडगे महाराज

संत गाडगे महाराज

              संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगे महाराज यांचा जन्म  २३ फेब्रुवारी  १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगाव या गावी झाला , त्यांचे नाव डेबुजी होते ,  ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते.१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला.दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली.देव, देव करत लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत, कर्मकांड लोकांना अधोगतीकडे नेते हे जाणलेल्या गाडगेबाबांनी विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रसार आणि प्रचार करायला सुरुवात केली. समाजाची प्रगती ही स्वच्छतेतून होईल, शिक्षणातून होईल. हरी हरी करून कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी लोकांना प्रयत्नवादी व्हावे लागेल, हे त्यांनी जाणले. ते फक्त विचार मांडणारे कीर्तनकार नव्हते तर प्रत्यक्ष विचार आचरणात आणून नंतरच त्यावर भाष्य करणारे होते. खेड्यापाड्यातील गल्लोगल्ली स्वत: खराटा फिरवणारे होते. स्वच्छतेच्या मोहिमेचा उपयोग जातीजातीतील भेदभाव नष्ट करण्यासाठीही त्यांनी केला. स्वच्छतेचे महत्त्व त्यांनी विदर्भापासून खानदेशापर्यंत, पश्चिम महाराष्ट्रापासून मुंबई, कोकणापर्यंत कीर्तनाच्या माध्यमातून पोहोचवले. शिक्षण, सावकारी, देवस-नवस, पशुहत्या यांसारखे विषय घेऊन मायबोलीत कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन केले.अंधश्रद्धेवर, मूर्तिपूजेवर गाडगेबाबा बोच-या शब्दांत मार्मिकपणे हल्ला चढवायचे ‘अरे तुमी पंढरीले जाता, शेगावले जाता; पण त्यो तुमचा म्हणतात, ‘असा कसा तुमचा देव? कुत्रं निवद खाते तर त्याला हाडबी नाही मनत.’ हे ऐकून काही लोकांना हसू यायचे, तर देव मानणा-यांना राग यायचा. पण कीर्तनाला बाया, मुले, माणसे गर्दी करायचे.  मा. म. देशमुख गाडगेबाबांबद्दल लिहितात, ‘गाडगेबाबांनी भारतीय समाजाचे मन स्वच्छ केले.’
ज्या गावात संत गाडगेबाबांचे कीर्तन असायचे त्या गावात दवंडी देऊन ग्रामस्थांना माहिती दिली जायची. त्या गावात जाऊन दिवसभर गल्ल्या स्वच्छ करून संध्याकाळी त्याच गावात कीर्तन करत असत. कीर्तनात टाळ, मृदंग, खंजिरी असायची. एक उदाहरण संपले की, ‘गोपाला, गोपाला देवकीनंदन गोपाला..’या धृवपदाचा कीर्तनात गाभा असायचा. बाबा हे धृवपद हात उंच करून टाळ्या वाजवत तालात म्हणत, तसेच कीर्तन ऐकणा-यांना त्याच तालावर म्हणायला सांगायचे. मग दुसरा विषय घेऊन पुन्हा कीर्तनाला सुरुवात होई. ते ग्रामस्थांच्या, समाजातील अंधश्रद्धेवर टीका करून मवाळ भाषेत कथाकथन करून श्रोते आपलेसे करायचे. त्यांची भाषा गावाकडची. व-हाडी भाषा. त्यामुळे मले, तुले, बावा, लेकरू, पोरगं असे शब्द ते कीर्तनात वापरत असत. त्यातला मर्म समजला की, लोक पोट धरून धरून हसून दाद द्यायचे.  देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत.. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. असा हा स्वच्छतेचा पुजारी आधुनिक समाज सुधारक. आज इथे उद्या तिथे. अंगावर फाटक्या चिंध्यांचे कपडे व पाणी पिण्यासाठी गाडगे घेऊन, आज एका गावाला तर उद्या दुस-या गावाला, ना अन्नाची, ना जेवणाची, ना झोपण्याची फिकीर. जे मिळेल ते खायचे. जेथे जागा मिळाली तेथे झोपायचे. त्यांना फक्त एकच ध्यास होता तो कीर्तनातून लोकजागृती करायची. त्यापायी त्यांनी उभ्या संसाराकडे पाठ फिरवली. त्यांनी कीर्तनातून समाज प्रबोधनाचे महान कार्य केले. हे कार्य ते आजीवन करीत राहिले.संत गाडगेबाबा यांनी लोकशिक्षणाचे कार्य विदर्भातील ऋणमोचन या गावापासून सुरू केले. १९०८मध्ये पूर्णा नदीवरील घाट सर्वधर्मीयांसाठी, जातीसाठी खुला केला. १९२५ला मूर्तिजापूर येथे गोरक्षण धर्मशाळा व विद्यालय स्थापन केले. १९२७ला पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा सुरू केली.त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले म्हणून आठ फेब्रुवारी १९५२ रोजी श्रीगाडगेबाबा मिशन स्थापन केले. बाबांनी  डॉ. पंजाबराव देशमुख यांना शिक्षणसंस्थांद्वारे शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या कार्यात मदत केली. त्याद्वारे त्यांनी महाराष्ट्रभर शिक्षणसंस्था व अनाथ, अपंग यांच्या पुनर्वसनासाठी त्र्यंबकेश्वर, आळंदी, पंढरपूर इत्यादी ठिकाणी धर्मशाळा स्थापन केल्या.आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल एका ठिकाणी म्हणतात, ‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात.’ १९३१ला वरवंडे येथे संत गाडगेबाबांच्या प्रबोधनाने पशुहत्या बंद झाली. १९५४ मध्ये जे. जे. रुग्णालय परिसरात त्यांनी धर्मशाळा बांधली. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांची संत गाडगेबाबांशी मुंबईला तसेच पंढरपूरला भेट झाली. पंढरपूरची चोखामेळा धर्मशाळा संत गाडगेबाबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली होती. या आधुनिक विज्ञानवादी संताचा डॉ. आंबेडकर आदर करीत. त्यांना ते गुरुसमान मानीत.. एकदा मुंबईच्या भायखळा मार्केटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचे भाषण सुरु होते ,अचानक गाडगे बाबांना पाहून बाबासाहेब देखील अचंबित झाले. वर केलेल्या दोन्ही हातात हार घेउन स्टेजसमोर उभ्या असलेल्या गाडगे महाराजांना बाबासाहेब म्हणाले." बाबा तुम्ही खाली का उभे..? वर या ना..". " नाही बाबासाहेब तुम्हीच खाली या आणि या अडाण्या चाहार घ्या.. वेळ होत होता म्हणून बाबासाहेब जरा रागातच म्हणाले.बाबा तुम्ही, स्टेजवर का येत नाही..?त्यावर ते संतशिरोमणी गाडगे महाराज शांतपणे स्नेहाद्र आवाजात बोलले..बाबासाहेब..तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात, त्या स्टेजला पाय लावायची माझी तरी लायकी नाही.गाडगेबाबांच्या तोंडून असे बोल बाहेर पडताक्षणीच बाबासाहेब मंचावरून खाली उतरले. त्या महान संतांची पुष्पमाला स्वीकारली आणि दोघांनी एकमेकांना प्रेमाने कडकडून मिठी मारली. " आता तुमचे चालू द्या.असे बोलून क्षणांत गाडगे महाराज निघून गेले. त्या धर्माचा दहा कलमी कार्यक्रम समाजापुढे ठेवला. 
भुकेल्यांना अन्न, लहान लेकरांना अन्न, वस्ती नसणा-यांना वस्ती, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण, घर नसणा-यांना घराचा निवारा, आसरा, काम नसणा-यांना कामधंदा, रोजगार, अंध, अपंग, रुग्णांना औषधे, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न जमवून देणे, दु:खी, निराश असणा-यांना हिंमत देऊन जगण्याचे बळ देणे इत्यादी त्यांचे विचार आजही सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. त्यांनी रोकडा धर्म सांगितला. त्यांनी कीर्तनातून विज्ञानवादी लोकजागृती, लोकप्रबोधनाचे कार्य अखेरच्या श्वासापर्यंत केले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देवून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.